
एएनआयच्या रिपोर्टनुसार, अधिवक्ता ममता राणी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्या ममता राणी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ममता राणी यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, ‘सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. कारण चित्रपटातील भगवान श्री राम आणि भगवान हनुमाना यांच्यासह धार्मिक पात्रांच्या वास्तविक रूपाशी छेडछाड करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर बंदी घातली नाही, तर लोकांच्या नैतिक मूल्यांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.’







