
काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आरोहीच्या येण्याने सर्वकाही बदलले आहे. मालिकेच्या कथानकाने वेगळे वळण घेतले आहे. आरोहीवर बलात्कार करणाऱ्या नराधामांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी अरुंधती आणि आशुतोष लढत आहेत. तिला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करत आहेत. मात्र, या सगळ्यात अरुंधतीच्या कुटुंबावर संकट ओढावले आहे. त्यामुळे कांचन आजी या सगळ्या विरोधात असतात. त्यांना आपले कुटुंब संकटात असल्याने भीती वाटू लागते. त्या अरुंधतीला तक्रार मागे घेण्यास सांगतात. अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम आहे.







