
मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्या दाखवण्यात आले आहे की, अनिश ईशाला म्हणतो की, तुझ्यासाठीच काय तर इतर कोणासाठीही मी माझ्या माणसांना दुखावणार नाही. तेव्हा ईशा म्हणते की हे तू नाही बोलत आहेस, तर तुझ्या तोंडून माझी आई बोलते आहे. ईशा अरुंधतीकडे वळते आणि विचारते की, ‘अजून किती कारस्थानं करणार आहेस आई?’ यानंतर अरुंधती आशुतोषला सांगते की, अनिश आणि ईशा इंदौरला जातील आणि त्यांना त्यांचे वेगळे घर करुन राहू दे. त्यांना असे बोट धरुन चालवणे बंद केले पाहिजे.








