
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी कथा आहे. त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मग ती अरुंधती असु दे किंवा मग संजना. मालिकेत सतत काही ना काही सुरुच असते. काही दिवसांपूर्वी अभीने कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने सर्वजण दुखावले गेले. पण तरीही अभी त्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता मालिकेत कांचन आजी थोड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळते.








