
त्यानंतर आरोही आणि यश यांचा विवाहसोहळा एक महिन्यात झाला पाहिजे असे कांचन आजी म्हणतात. कारण गुरुजींनी त्यांच्या संसारात अनेक अडचणी येणार असल्याचे सांगितले असते. त्यामुळे आशुतोषशी बोलून कांचन आजी लग्नाची तारीख काढण्याचे ठरवतात. अरुंधती यश आणि आरोहीची परवानगी घेते. तेवढ्यात आरोही ही सर्वांसमोर एक मांडते. ‘माझे कोणी कुटुंबीय नाहीत, माझे घर पण नाही. माझे जे काही ते आश्रमाशी जोडलेले आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की आमचे लग्न आश्रमात व्हावे’ असे म्हणते. आशुतोषला ते ऐकून आनंद होतो. पण कांचन आजी यासाठी तयार होणार का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.








