
‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यशला खात्री असते की त्याला अरुंधतीचा पाठिंबा असणार आहे. मात्र, या सगळ्याला कांचन आजी जोमाने विरोध करतात. मालिकेत आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








