
दुसरीकडे अरुंधती आश्रमात मीडिया बोलावून घट बसतात म्हणून मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अरुंधतीने मीडियाला देखील बोलावले आहे. तसेच आरोहीवर बलात्कार करणारे करण देशमुखचे वडील देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ते सुलेखा ताईंना सांगतात की मला आश्रमाला मदत करण्यासाठी लाखो रुपये देतात. त्यानंतर आता कार्यक्रमात आरोही एक नाटक सादर करणारा आहे. या नाटकात तिने तिच्यावर झालेले अत्याचार दाखवले आहेत. नाटकाच्या शेवटी ती म्हणते की माझ्यावर करण देशमुखने बलात्कार केला आहे. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो.








