
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही ना काही घडत असते. प्रत्येक पात्रासोबची एक वेगळी कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. आरोहीची जेव्हा पासून मालिकेत एण्ट्री झाली आहे मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. आता आरोहीने यशसमोर प्रेमाची कबूली दिली आहे. त्यानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या या निर्णयाला देशमुख कुटुंबीयांचा पाठिंबा असणार का? असा प्रश्न पडला आहे.






