
दुसरीकडे केळकरांच्या घरी थोडे वातावरण शांत वाटते. मनू सकाळी उठून देशमुखांकडे असलेल्या पूजाला जाण्याचा निर्णय घेते. सगळेजण पूजेची तयारी करत असतात. तेवढ्यात अरुंधती तिन्ही मुलांचे कौतुक करते. आता ती मोठी झाली आहेत. पण पुन्हा मनूची जबाबदारी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले. ते ऐकून आशुतोषला राग येतो. नाही टाकणार मनूची जबाबदारी तुझ्यावर असे बोलून तेथून निघून जातो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







