
कांचन आजीचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीला पाठिंबा देतात. मात्र, सतत अरुंधतीला घालून पाडून बोलण्याची एकही संधी न सोडणारा अनिरुद्ध देखील तिला पाठिंबा बोलतो. तो म्हणतो, ‘अरुंधती आपल्यामध्ये हजारो मतभेद आहेत आणि लाखो होतील. पण आज मी तुला वचन देतो की तुझ्या या लढाईमध्ये मी तुझ्यासोबत आहे.’ ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे सगळे तो त्याच्या स्वार्थासाठी करत आहे की त्या मागे अनिरुद्धचा काही हेतू आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.






