
मात्र, आता कांचन आजी सगळ्यांनाच एक मोठं सरप्राईज देणार आहे. अरुंधतीच्या लग्नसोहळ्यात कन्यादानाचे विधी सुरू असताना गुरुजी आप्पांसह कांचन आजीला देखील बोलवायला सांगतात. मात्र, कांचन येणार नाही, अरुंधतीचं कन्यादान मी एकटाच करणार असं आप्पा म्हणतात. इतक्यात कांचन आजी या लग्न सोहळ्यात येते आणि मी अरुंधतीचं , माझ्या मुलीचं कन्यादान करेन, असं म्हणते. हे ऐकून आता सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. देशमुख कुटुंबातील आणखी एक व्यक्ती आता या सोहळ्यात सहभागी होणार आहे.