
‘काय मुर्खपणा आहे हा. तुमच्या दोघांचं भविष्य एकत्र नाही हे मी आधीच सांगितलं होतं. मला न विचारता त्यांना कोणी बोलवलं. मी त्यांच्याशी बोलणार नाहीये’ असे अनिरुद्ध बोलतो. त्यावर अण्णा ‘मग बाहेर भेटायचं होतं का? फक्त बोलायला काय हरकत आहे. आणि तुला कोणी त्यांच्याशी बोलायला सांगितलं आहे. अरुंधती येणार आहे. ती बोलेल ईशासाठी. तू घरी थांबला नाहीस तरी चालेल’ असे उत्तर देतात. लगेच कांचन ‘बघू तरी माणसं कशी आहेत. गेल्या वेळी तो साहिल आला होता आठवतय ना. काय म्हणत होता त्यांचे दारुचे ठेके आहेत’ असे म्हणते.







