
आपल्यासोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या संजनाच्या प्रेमात पडल्यावर अनिरुद्धने अरुंधतीसोबतचा २५ वर्षांचा मोडून संजानाशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता संजना आणि अनिरुद्धच्या संसारात देखील काही गोष्टी बिनसल्या आहेत. सततचे वाद आणि भांडणं यामुळे कंटाळून आता संजना आणि अनिरुद्ध यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र, त्या आधीच अनिरुद्धच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. मात्र, ही व्यक्ती नक्की कोण हे अद्याप समोर आलेले नाही.






