
अनिश आणि ईशा यांच्या नात्यातील गुंतागुंत सोडवताना त्याचा राग अनावर झाला अन् त्याने अनिशच्या श्रीमुखात भडकावली. मात्र, यानंतर आपल्या वडिलांनी अर्थात अनिरुद्धने अनिशची माफी मागावी, अशी अट ईशाने घातली आहे. मालिकेच्या कथानकातील हाच ट्रॅक प्रेक्षकांच्या पचनी पडलेला नाही. चाहते आणि प्रेक्षक या मालिकेवर टीका करत असून, कथानकात बदल करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. ‘वडील कितीही वाईट वागत असले, तरी त्यांना सर्वांसमोर माफी मागायला लावणं अतिशय चुकीचं आहे’, असं एका प्रेक्षकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे.






