
अनिश ईशाला समजवतो की ते सगळे मोठे आहेत. त्यांचे आपल्याला ऐकायला हवे. आपले लग्न झाले नाही आजून. तुझा या सगळ्यांवर इतका राग आहे तर कशाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवते आणि त्यांच्याकडेच सगळ्या मागणे करते. इतकच असते तर त्यांनी आपल्याशी नाते तोडले असते. आता ते आपले लग्न लावतायेत हेच खूप मोठे आहे. आता तू आत चल बास झाले असे बोलतो. त्यावर ईशा म्हणते तू तर माझ्यावर हक्क गाजवतोय. त्यावर लगेच अनिश म्हणतो की, ‘तुला प्रेमाने सांगून कळत नाही. तुला अशाच प्रकारे सांगायची गरज आहे.’ तेवढ्यात जानकी येते आणि त्यांच्यामधील संभासण पूर्णपणे बदलते.








