
आशुतोष आणि अरुंधतीचे लग्न होऊ नये, यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. अरुंधतीच्या लग्नाच्या विषयामुळे देशमुख कुटुंबात आता चांगलाच गदारोळ माजला आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न मोडावं, म्हणून अनिरुद्ध नवनव्या शकला लढवताना दिसत आहे. मात्र, त्याच्या या सगळ्या प्रयत्नांना फोल ठरवत अरुंधती आपलं आणि आशुतोषचं नातं एक पाऊल पुढे नेणार आहे.