
आशुतोषच्या निधनाला सुलेखा ताई अरुंधतीला दोषी मानतात. त्या अरुंधतीसोबत आता माजा काही संबंध नाही असे म्हणतात. आता अरुंधती कुठे जाणार? कशी राहणार? असे प्रश्न सर्वांना पडला आहे. या सगळ्यात अनिरुद्ध आणि कांचन आजी पुढे सरसावतात. ते अरुंधतीची पुन्हा जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या या निर्णयाने संजनाच्या मनात भीती निर्माण होते. आता अनिरुद्ध आणि हे घर तिच्या हातून निघून जाणार असल्याची भीती तिला वाटते. शेवटी ती एका वकीलाचा सल्ला घेते. त्यावेळी तो वकील देखील हेच सांगतो जर घर अप्पांच्या नावावर आहे तर ते कोणाच्याही करु शकतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.








