
संपूर्ण देशमुख कुटुंब घटनास्थळी पोहोचते. त्यांना पाहून ती मुले पळून जातात. त्यांच्यामधील एक मुलगा अनिरुद्ध आणि यशच्या तावडीत सापडतो. ते त्याला बेदम मारतात. तेवढ्यात यशच्या हातात एक चाकू येतो आणि तो चाकू तो रागाच्या भरात पोटात खुपसतो. आता या मुलांसोबत यशला देखील शिक्षा होणार का? ती मुले पकडली जाणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.






