
अभिषेक खूप थकून घरी आला आहे. त्याला चालण्याचे देखील त्राण नाही. यश आणि संजनाने त्याला अक्षरश: हॉलमध्येच झोपवले आहे. अभीची अशी अवस्था पाहून अरुंधती आणि संजनाला काळजी वाटत आहे. सगळेजण त्याला नेमकं काय झालय हे विचारतात. तेव्हा अभी सागंतो की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सध्या खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण खूप मेहनत घेत आहेत. अशात एका पेशंटचा त्याच्यामुळे मृत्यू झाला असे त्याला वाटत आहे. संजना त्याला समजावण्याचा प्रयत्न करते मात्र अभी कोणाचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आता आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







