
महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडत चालले असून अल्पसंख्यंक समाजावर ठिकठिकाणी हल्ले होत असून हे हल्ले त्वरित थांबवावे, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार, माजी कामगार मंत्री हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन दिवस उलटले असून गृहमंत्री कोण याचा पत्ता नाही. मात्र ठिकठिकाणी अल्पसंख्यंक समाज आणि त्यांच्या संस्थांवर काही समाजकंटकांकडून हल्ले होत असून ते त्वरित थांबवण्याची विनंती दलवाई यांनी केली आहे.





