
मात्र, कल्पना तिला प्रेमाने दटावून म्हणते की, ‘तुझा नवरा आहे ना, मग तूच घेऊन जा’ असं म्हणत कल्पना सायलीला जबरदस्तीने ऑफिसला पाठवते. सायली अर्जुनचा डब्बा घेऊन ऑफिसला जायला निघते. मात्र, आज हा डब्बा घेऊन गेले, तर त्यांना माझी सवयच लागेल आणि जर नाही घेऊन गेले तर त्यांना चांगलाच धडा मिळेल आणि पुन्हा ते कधीच डबा घरी विसरून जाणार नाहीत’, असा विचार सायलीच्या मनात येतो. या विचारामुळे सायली पुन्हा माघारी फिरणारी इतक्यात तिच्या मनाला रुखरुख लागते की, मी जर डबा दिला नाही तर, अर्जुन सर उपाशीच राहतील किंवा बाहेरचं खातील आणि त्यांना त्रास होईल, असं तिला वाटू लागतं.








