
भाजपकडून ३.६ किलोमीटर लांब रोड शो पहिल्यापासून नियोजित होता. भाजपची इच्छा होती की, हा रोड शो कोयंबतूरमधून सुरू व्हावा. मात्र स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरून या रोड शो ला परवानगी दिली नाही. प्रशासनाने म्हटले की, या रोड शो मुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे याला मंजुरी देता येणार नाही. मात्र याविरोधात भाजपने मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला व कोर्टामार्फत या रोड शोला परवानगी मिळवली.