
“सध्या अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे. आपण सोशल मीडियावर एखादी पोस्ट करतो आणि आपले हजारो मित्र तू असं सरकारविरोधी बोलू नकोस असे सांगायला येतात. खरे सांगायचे झाले, तर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे हे आपले काम आहे. प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य देखील आहे. पण, आता सत्ताधाऱ्यांना कोणीच काही बोलायचे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतेच सत्ताधारी परफेक्ट नसतात आपण त्यांना त्या दिशेने घेऊन जायचे असते. जनता एखाद्या गोष्टीवर नाखूश असेल, तर सत्ताधाऱ्यांवर दबाव आला पाहिजे. पण, आता हे होतच नाहीये” असे किरण माने म्हणाले.








