
समाजाशी गद्दारी करणार नाही- जरांगे
मराठा समाजाशी मला गद्दारी करायची असती तर मी करू शकलो असतो, परंतु मी समाजाला मायबाप मानलेलं आहे. त्यामुळं समाजाशी मी कधीही गद्दारी करू शकणार नाही. सरकारचे मंत्री आल्यानंतर त्यांनी मला कोपऱ्यात येण्यास सांगितलं, परंतु जे बोलायचं ते सर्वांसमोर बोला, असं मी त्यांना ठणकावून सांगितलं होतं, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. याशिवाय प्रत्येक मराठ्याने उद्यापासून कामाला लागायला हवं, आरक्षणाचा लढा आणि पुढील दिशा मराठ्यांच्या घरी जावून सांगा, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी उपस्थितांना केलं आहे.






