
ओवी आपल्या मर्जीविरुध्द उमा सोबत तिच्या घरात राहत असली तरी, तिला पावलोपावली आपल्या आईची आठवण येत आहे. तिला पुन्हा एकदा आपल्या घरी परतून जावे असे वाटत आहे. संध्याच्या कार्याच्या दिवशीही पुन्हा एकदा ओवीला आपल्या आईची आठवण येत होती. ओवी आपल्या आईला म्हणजेच संध्याला अबोलीची फुलं आवडायची म्हणून ओंजळभर फुलं घेऊन नदीच्या काठी जाऊन ती आईच्या आठवणीत तिला श्रद्धांजली म्हणून वाहत होती. त्यावेळी ‘मला इथे राहणं कठीण झालं आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आई’, असं ओवी बोलत असताना निशी ते ऐकलं होतं.








