
सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो हे आर्टिफिशियल इंटेलीजेंसद्वारा तयार करण्यात आले आहेत. हे फोटो खरे नसून AI द्वारे तयार करण्यात आले आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीमधील या कलाकारांनी लग्नगाठ बांधावी अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले.






