
महाराष्ट्रातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यानंतर अजितदादा तरुंगात जातील, असा दावा केला होता. यावरून अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्यावर निशाला साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचं, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग चालू आहे.”






