
मुंबई : राज्यात पवसाने गेल्या काही दिवसांपासूंन विश्रांती घेतली आहे. मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली तर राज्यात मात्र, पाऊस गायब झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याच्या तुलनेत सरासरी पाऊस कमी झाला आहे. दरम्यान, राज्यावर अनेक ठिकाणी केवळ ढगाळ हवामान असून ही परिस्थिती २० ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे, त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होऊ शकतो अशी माहिती, हवमान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.






