
ती म्हणते, “तुम्ही चुकीचा विचार करताय अनिरुद्ध.” तेवढ्यात अप्पा म्हणातात, बास अनिरुद्ध. अरुंधतीला दोष दिल्याशिवाय तुझा एकही दिवस जात नाही. आता या क्षणी आपण या मुलांना समजवणे गरजेचे आहे. आता मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ईशाला तिच्या चुकीची जाणीव होणार का? लग्नानंतर ईशा आणि अनिश कुठे राहणार? आशुतोषही त्यांना घराबाहेर काढणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.






