Monday, August 17, 2026
Homeसाताराजयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्ष भाजपचाच; तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, शंभुराज देसाईंची भूमिका

जयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्ष भाजपचाच; तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, शंभुराज देसाईंची भूमिका

जयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्ष भाजपचाच; तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, शंभुराज देसाईंची भूमिका

[ad_1]

सातारा : साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार आता पुढच्या टप्प्यावर गेला असून भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकल्याचं चित्र आहे. कमी जागा आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, आम्हाला ‘प्लॅन बी’ची गरज नाही असं शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्ववादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. आमचा ए प्लॅन तयार आहे, आम्हाला बी प्लॅनची गरजच नाही असं ते म्हणाले. त्याचबरोबर भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत चर्चा नाही, असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी ठामपणे सांगितलं.

अध्यक्ष भाजपचाच, गोरेंचा दावा

तर दुसरीकडे भाजपचीही तितकीच आक्रमक भूमिका समोर येत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे. जागा कमी आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं. अध्यक्ष भाजपचाच व्हावा यासाठी वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करू असं गोरे म्हणाले.

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

इतर: 02

शिवसेना आणि भाजपच्या भूमिकेनंतर साताऱ्यात आता आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीत सेना भाजपची मैत्री टिकणार की सत्तेसाठी वेगळी चाल खेळली जाणार?साताऱ्याच्या सत्तेचा हा संग्राम आता वरिष्ठ पातळीवर पोहोचणार का? राजकीय पटलावर पुढची चाल कोण टाकणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ही बातमी वाचा : 

आणखी वाचा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments