
- Marathi News
- Opinion
- We Will Have To Fight Alone In A War With Pakistan, It Is Futile To Expect From Western Countries
2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
१० मे रोजी सकाळी जम्मूमध्ये झालेल्या स्फोटांच्याआवाजाने मला जाग आली. पहाटेचे ५ वाजले होते. त्याचक्षणी माझा फोन वाजला. श्रीनगरमधील माझा सहकारीजफर इक्बालही जागा होता. त्याने मला सांगितले, युद्धसुरू झाले आहे. मी नाइट सूटमध्ये स्फोटांच्या दिशेने पळतगेलो. माझा कॅमेरामन अजूनही झोपलेला होता. शहराच्यामध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या भागातपाकिस्तानी ड्रोन रोखण्यात आल्याचे आम्हाला आढळले.आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर एका घराचे छत उडूनगेल्याचे दिसले. तिथे तिरंगा झेंडा फडकत होता. तेभारताच्या सामर्थ्याचे प्रतीक होते.
ते ज्या कुटुंबाचे घर होते – त्यात एक अस्वस्थ आईतिच्या दोन छोट्या मुलांसह रडत होती. ती अजूनही जिवंत आहे याबद्दल तिने अश्रू ढाळत भारतीय सशस्त्र दलांचेआभार मानले. सर्वत्र कचरा पसरलेला होता, रस्त्यावरखड्डे होते, अनेक घरांच्या भिंती पडल्या होत्या आणिभीतीचे वातावरण होते. कॉलनीपासून थोड्या अंतरावर असलेल्या शंभू मंदिरावर आणखी एक पाकिस्तानी ड्रोन अडवण्यात आला. एका रहिवाशाने मला सांगितले की,हवाई हल्ल्याच्या सायरनमुळे शेकडो लोकांचे जीववाचले.
त्याच सकाळी माझ्या कार्यक्रमात ब्रिगेडियर संदीप थापर- ज्यांचे आदल्या रात्रीपर्यंत असे मत होते की, पाकिस्तानचिथावणीला बळी पडणार नाही – यांनी आपला विचारबदलला. ते म्हणाले, हे आता एक संपूर्ण युद्ध आहे.
आपल्या देशावर आता काय संकट आले आहे, हेलोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. ऑपरेशनसिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तान व पीओकेतीलदहशतवादी छावण्यांवर हल्ले केले व हे स्पष्ट केले की, हेहल्ले वाढवणारे नाहीत, परंतु पाकिस्तानने धोकादायकपद्धतीने प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरव्यतिरि क्त पाकिस्तानआपल्या पंजाब प्रांतावर हल्ला करण्याच्या तयारीत होता,कारण भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्यापंजाबमधील मुरीदके व बहावलपूर येथील लष्कर वजैशचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. मुरीदकेलाहोरपासून तितकेच दूर आहे, जितके गुरुग्रामदिल्लीपासून आहे. पाकिस्तानच्या राजकारणात वलष्करात पंजाबचे वर्चस्व आहे. त्याला वाटले की,भारताने त्याच्या मज्जातंतू केंद्रावर हल्ला केला आहे.गुजरात व राजस्थानच्या सीमेवर ड्रोन पाठवण्याचे प्रयत्नहीकरण्यात आले.
भारताची हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तानचे हवाई तळ- नूर खान, रहीम यार खान, सरगोधा – नष्ट करू शकलीनसती व आपण लाहोर व कराचीतील हवाई संरक्षणप्रणालींना नुकसान पोहोचवले नसते, तर हे युद्ध खूपलांबले असते. ऑस्ट्रियाचे हवाई युद्ध तज्ज्ञ टॉम कूपरयांनी मला सांगितले की, सरगोधा संकुलातीलपाकिस्तानच्या भूमिगत अणुसुविधेच्या प्रवेशद्वारावरीलहल्ला हा शेवटचा वळणबिंदू असू शकतो. पाकिस्तानअशा परिस्थितीत पोहोचला होता, जिथे तो आपल्याअण्वस्त्रांचे संरक्षणही करू शकत नव्हता. आणखी एकपाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादा म्हणाले की,भारताकडून होणारे हल्ले ४८ तास चालू राहिले असते तरपाकिस्तानी हवाई दल कोसळू शकले असते.
आणि म्हणून जो दिवस पहाटे ५ वाजता सुरू झालाहोता आणि आपण एका पूर्ण युद्धाकडे वाटचाल करतआहोत, असे वाटत होते, तो दिवस अचानकसंध्याकाळी ५ वाजता संपला. पाकिस्तानच्याडीजीएमओकडून फोन आल्यावर भारताने युद्धबंदीलासहमती दर्शवल्याची घोषणा करण्यात आली. येथे हेअधोरेखित करणे महत्त्वाचे आहे की, भारताने युद्धबंदीहा शब्द वापरला नाही आणि वारंवार सांगितले आहे की,हा केवळ चालू असलेल्या कारवाईत एक विराम आहे.ट्रम्प कितीही प्रयत्न करत असले तरी हे स्पष्ट आहे की,भारताची लष्करी आघाडी नसती तर हा संघर्ष दीर्घकाळटिकला असता. आणि पाकिस्तानच्या हवाई तळांनाइतका मोठा फटका बसला नसता, तर हा संघर्ष आणखीवेगाने वाढू शकला असता.
भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारण्याचे पाकिस्तानचे प्रयत्नव ते रोखण्यात ढोंगी पाश्चात्त्य जगाचे अपयश हे दोन्हीकायम आहेत. अशा परिस्थितीत आपण हे समजूनघेतले पाहिजे की, आपल्याला पाकिस्तानविरुद्धचे युद्धएकट्यानेच लढावे लागेल. चीनचा हात पाकिस्तानच्याखांद्यावर असेल, तर पाश्चात्त्य देश आणि त्यांचीमाध्यमे या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असल्याचेभासवत राहतील.