पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना झापणं असो, पहाटेच्या वेळी पाहणी असो किंवा एखाद्या गोष्टीवरती त्यांची मिश्किल प्रतिक्रिया असो. अशातच अजित पवारांनी (Ajit Pawar) साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमावेळी केलेल्या स्फोटक भाषणाची सध्या चर्चा आहे. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) होय मी कडक आहे, मला वेड लागलं का? जर मी कडक असतो तर बारामतीकरांनी मला इतक्या वेळी निवडून दिलं असतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणालेत अजित पवार?
आता आम्ही लोक चांगलं काम करू पाहत आहोत. आम्ही पण सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे मला कुठेही आळस नाही. मला पण कामाची आवड आहे. मगाशी बाळासाहेब बोलले, अजित दादा (Ajit Pawar) कडक आहेत, आहे मी कडक, पण कोणाकरीता कडक आहे. मी चुकीचं वागणाऱ्याकरिता कडक आहे. जर तुम्ही योग्य वागलात तर मी पण तुम्हाला पाठिंबाच देईल ना. तुम्ही जर चुका केल्या नाहीत तर मला काय वेड लागलं आहे का? कडक वागायला. मी जर कडक वागलो असतो तर बारामतीकरांनी मला आठ वेळेला निवडून दिलं असतं काय? नावातच बारामती आहे. तिथंल प्रतिनिधीत्व करायचं आहे. ते काय येड्या गबाळ्याचं काम नाही, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
तर तुम्ही योग्य पध्दतीने काम करा. तुम्ही लोकांना फसवू नका. लोकांची दिशाभूल करू नका.याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला असलं काही करू नका. या बोटाचा थुका त्याला त्या बोटाचा याला असलं काही करू नका. जे आपल्याला करता येईल तेच लोकांना सांगा. जे करता येत नाही त्याबद्दल लोकांना विश्वासात घ्या. याबद्दल ही ही अडचण आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण 7 लाख 20 कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना साडेतीन लाख कोटी मला राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर द्यावे लागतात. राहिलेल्या साडे तीन कोटींमध्ये आपण राज्याच्या सर्वांगिण विकासाकरता वापरतो. त्याचबरोबर रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील त्याच्यावरती प्रयत्न करत आहेत. याच पध्दतीने आम्ही 35 वर्षे समाजकारण आणि राजकारण करतो आहे. अकराव्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे भरपूर अनुभवांची शिदोरी सोबत आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..