
दुष्काळ, अतिवृष्टी व पिकांना हमीभाव नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती फारच बिकट झाली आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. १५ वर्षांपूर्वी घेतलेल्या दीड लाखाची परतफेड होत नसल्याने एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.




