
Mohan Bhagwat On pahalgam attack : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा केवळ कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माच्या नावावर नसून धर्म आणि अधर्म यांच्यात आहे. धर्माच्या आधारे लोकांची हत्या करणारे धर्मांध असून असे वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यावर भर देताना संघप्रमुख म्हणाले, ‘आमच्यात ताकद असेल तर ती दाखवावी लागेल.







