
Priyanka Gandhi Attacks Narendra Modi : लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत पहिलं भाषण केलं. संविधानावरील चर्चेची सुरुवातच त्यांच्या भाषणानं झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांच्या राजवटीसह आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणार नाही,’ असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला.








