
महेश मांजरेकर यांनी नुकत्याच ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका मुलाखतीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सोडण्यावर मोठा खुलासा केला आहे. हा चित्रपट सोडण्यामागचं कारण देखील महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने स्वतः केले आहे. मात्र, सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर सांभाळणार होते. त्यांनी अर्ध्यातूनच हा चित्रपट सोडला. यानंतर अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. याबद्दल रणदीपला देखील प्रश्न विचारले गेले होते. मात्र, त्याने नेहमीच यावर उत्तर देणे टाळले. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यावर मौन सोडले आहे.







