
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिक या खलनायकाची एण्ट्री झाल्यापासूनच सगळ्या काही वेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. कोळी कुटुंबीयांनी मुक्ताला घराबाहेर काढले आहे. पण सागरला मुक्तावर पूर्ण विश्वास आहे की ती असे काही करणार नाही. या सगळ्यात मुक्ताला निर्दोषी ठरवण्यासाठी सागर पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतो. या सगळ्या संधीचा फायदा घेऊन सईची कस्टडी मिळावी म्हणून सावनी डाव आखते. मुक्ता आणि सागर ते डाव उडवून लावतात.








