[adning id=”1976″]
परळी; सोमनाथ राऊत : श्रावणी शनिवार म्हटलं की सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाविकांची पाऊले वळतात ती किल्ले जरंडेश्वर. निसर्गरम्य वातावरण, दाट धुके, पक्षांचा किलबिलाट, निम्म्या रस्त्यापर्यंत पायऱ्या तिथून पुढे जंगल सफर असा ट्रेक अन् त्यातून होणारे मारुतीरायांचे दर्शन यासाठी भाविकांची गर्दी जरंडेश्वरवर अगदी भल्या पहाटेपासून होत असते.
सातारा कोरेगाव रस्त्यावरील जांब, त्रिपुटी येथून जरंडेश्वरवर जाता येते. तसेच अन्यही दोन मार्ग जरंडेश्वरवर जाण्यासाठी आहेत. श्रावणी शनिवार म्हटलं की जरंडेश्वर हाउस फुल होतो. पहाटेची काकड आरती त्यानंतर होणारा खिचडीचा प्रसाद यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. गडावर प्रभू श्रीरामाचे व मारुतीरायाच्या नामाचा जयघोष सुरू असतो. पायऱ्यांवरून तसेच या मार्गावरून येता जाता भाविक “जय श्रीराम” असा जयघोष करीत असतात. गडावर प्रभू श्रीराम पंचायतन, मारुती रायाचे मंदिर, श्री शंकर महादेव मंदिर, अशा मूर्ती आणि दीपमाळ आहे. या गडावरील घंटा सर्वांचे आकर्षण ठरते.
हेही वाचा :






