
सावनीने आखला डाव
हर्षवर्धन सावनीवर जास्तच नाराज असतो. कारण आदित्यने त्यांचा संपूर्ण प्लान धुळीस मिळवला आहे. हर्षवर्धन आणि सावनीने सागरविरोधात गोळा केलेले पेपर तो फाडून टाकतो. आदित्यने पेपर फाडल्याने सावनी हर्षवर्धनची माफी मागते. सागरला मी कायमचे उद्वस्त करणार असून सागरला आता जेलमध्ये जाणार असल्याचे सावनी सांगते. ते ऐकून हर्षवर्धन खूश होतो. आता खरच सावनीचा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.







