
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी कलावती यांच्यावरून अमित शाहांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुल गांधींचे सामाजिक काम आणि त्यांनी दिलेला शब्द पक्का आहे, हे देशातील जनतेला माहिती आहे. राहुल गांधी यांनी कलावतीच नाही तर निर्भयाच्या भावाला पायलट बनवण्याचा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. सध्या सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. गृहमंत्र्यांच्या भाषणातून हे देशाला कळून चुकले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.






