
अभिरामचा होणार संताप!
घरात आल्यानंतर देखील अभिराम लीलावर खूप ओरडणार आहे. ‘तू माझी फसवणूक केलीस, मी तुझ्यावर विश्वास ठेवूनच चूक केली’, असं तो लीलाला म्हणणार आहे. मात्र, लीला त्याला सगळी खरी परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या बहिणीला म्हणजे रेवतीला कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि तिला सुखरूप सोडण्याच्या बदल्यात मला तुमच्याशी लग्न करण्यास सांगितलं गेलं, अस ती अभिरामला सांगणार आहे. मात्र, अभिराम लीलाच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीये. तो तिला ही गोष्ट सिद्ध करून दाखवायला सांगणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.







