
‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमात भाऊ कदम, निलेश साबळे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे या कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनेयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. हा कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल डोस होता. मात्र, आता यातील सगळेच कलाकार वेगवेगळ्या मंचावर आपली कला सादर करताना दिसत आहेत. एकीकडे निलेश साबळे याने त्याचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ नावाचा एक नवा कार्यक्रम सुरू केला. यामध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजने त्याची साथ देताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे हेमांगी कवी, कुशल बद्रिके, गौरव मोरे यांसारखे कलाकार हिंदीत आपलं नाव गाजवत आहेत.







