
राज्यसभेत केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या सरकारचा ३.० सुरू होणार आहे. या काळात विकासाचा वेग आम्ही कमी होऊ देणार नाही. आमची तिसरी टर्म आता दूर नाही. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढेल, सर्व कामे वेगाने सुरू राहतील. AI भारतात सर्वाधिक वापरले जाईल, येत्या ५ वर्षांत देशाला बुलेट ट्रेनची भेट मिळेल, येत्या ५ वर्षात प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे गॅस दिला जाईल, देशातील गरिबांसाठी पक्की घरे बांधणे सुरुच राहणार, देशातील गरिबांना मोफत धान्य देणे, मोफत उपचार देणे सुरुच राहील.








