
‘आशुतोषचं ‘जाणं’ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल…. ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल’, अशा आशयाची पोस्ट मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर आता प्रेक्षक कमेंट्स करताना दिसत आहेत. यात एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘मी ही मालिका रोज बघतो, मला सीनच्या लोकेशन्सबद्दल कायम एक प्रश्न पडतो… कथानक मुंबईत आहे असं तुम्ही सांगता, तसंच या सीनला तुम्ही एअरपोर्टला जात आहात असं दाखवता, मग मुंबईच्या कुठल्या भागातून असा रस्ता एअरपोर्टला जातो, जो इतका निर्मनुष्य आहे…? काहीतरी लोकेशन सेन्स असावा ना म्हणजे कथानक आणखीन रंजक होईल. एकही माणूस रस्त्यावर नाही, रस्ता सामसूम असं मुंबईत कुठे घडतं..?’







