
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भात काही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भात गडचिरोली, नागपूर, जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना बसला आहे.