
राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील दुरावस्थेचा प्रश्न बिकट होत चालला असताना दुसऱ्या बाजूला राज्यभरात योग्य पदवी न घेता प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, ही परिस्थिती चिंताजनक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसलेले हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असून याविरोधात सरकार नेमकं काय धोरण आखणार,असा सवाल आ. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. या बनावट पदवीधारक डॉक्टरांविरोधात राज्य सरकारने धोरण तयार करावे,अशी मागणीही त्यांनी केली.






