
लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ परत मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने अनेक मतदारसंघांत पिपाणी हे चिन्ह अपक्षांना देत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप पवार गटाने केला होता.





