
‘तुमच्या आणि माझ्या वयात प्रचंड अंतर आहे. आपण दोघे एकमेकांना अनुरूप नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहात, तर मी वेंधळी आहे. मी सतत गोंधळ घालत असते. आपली जोडी कुठल्याच बाजूनी जमणार नाही. त्यामुळे अंकल प्लीज तुम्ही माझ्याशी लग्न करू नका. मी तुमच्याशी लग्न करणार नाही’, असं म्हणून लीला पुन्हा एकदा अभिरामकडून वचन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, यावेळेस अभिराम एकही चकार शब्द बोलणार नाहीये. लीला अभिरामशी बोलून निघून गेल्यानंतर आता लीलाच्या घरी अभिराम जहागीरदारच्या पार्टीचे निमंत्रण पोहोचणार आहे.







