
तर, आत लीला आणि अभिराम एकमेकांना अंगठी घालत असताना तिथे साळुंके येणार आहे. कालिंदीने आपल्याला फसवलं, लीलाच तुझ्याशी लग्न लावणार सांगून तिने एजेशी लीलाचा साखरपुडा करून दिला, हे लक्षात आल्यानंतर आता साळुंके भलताच चिडणार आहे. रागाने त्याच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडून फुटणार आहे. आता तो कालिंदीकडून बदला कसा घेता येईल, याचा विचार करत तिथून निघून जाणार आहे. दुसरीकडे, कालिंदी घरी आल्यानंतर सगळ्यांसमोर आपल्या जावयाचा मोठेपणा सांगणार आहे. त्याचवेळी लीला आणि कालिंदी यांच्यासोबतच तिथे दुर्गाची एन्ट्री होणार आहे.








