
आता अभिराम काय करणार?
आता साखरपुड्याच्या प्रसंगी अंगठी काढून ताटात ठेवताना बॉक्समध्ये अंतराची अंगठी पाहून लीला हायसं वाटलं आहे. मात्र, पहिल्याच नजरेत अभिरामने ओळखले की, ही अंगठी खरी नसून, खोटी आहे. यावेळी अभिराम लीलाला बोलणार आहे की, ‘ही माझ्या अंतराची अंगठी नाही, ही खोटी अंगठी आहे. माझ्या अंतराची अंगठी कुठे आहे, तू आत्ताच्या आता सांग.’ मात्र, लीलाला त्याची काहीच कल्पना नसल्याने ती आता गप्प राहण्याचा प्रयत्न करणार आहे. लीलाने अंतराची खरी अंगठी हरवली आहे, हे कळल्यानंतर आता अभिराम पुढे काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.







